Ladki Bahin Yojna Installment Not Received: राज्य सरकारची अत्यंत लोकप्रिय असलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सध्या चर्चेत आहे. या योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत दिली जाते. मात्र, अनेक महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही त्यांच्या बँक खात्यात अद्याप अनुदानाची रक्कम जमा झालेली नाही. यामुळे लाभार्थ्यांमध्ये संभ्रम आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
ई-केवायसी प्रक्रिया आणि तांत्रिक अडचणी
शासनाने या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक केले होते आणि त्यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंतची मुदत दिली होती. लाखो महिलांनी ही प्रक्रिया वेळेत पूर्ण केली, तरीही अनेकांचे हप्ते रखडले आहेत. तांत्रिक विश्लेषणातून असे समोर आले आहे की, आधार कार्ड आणि बँक खाते लिंक नसणे (Aadhaar-Bank Linking Issue), अर्जात चुकीची माहिती भरणे किंवा ई-केवायसी करताना तांत्रिक त्रुटी राहणे यामुळे अनुदान जमा होण्यास अडथळे येत आहेत. विशेषतः ग्रामीण भागात माहितीच्या अभावामुळे अर्जामध्ये काही चुका झाल्याचे दिसून येत आहे.
अनुदानासाठी महिलांना आता काय करावे लागेल?
ज्या महिलांचे अनुदान रखडले आहे, त्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. महिला व बालविकास विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्या महिलांच्या अर्जात किंवा ई-केवायसीमध्ये त्रुटी आहेत, त्यांच्यासाठी पुन्हा पडताळणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अशा महिलांनी आपल्या जवळच्या तहसील कार्यालयात किंवा महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात संपर्क साधून आपले अर्ज पुन्हा तपासून घेणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी त्रुटी आढळतील, त्या दुरुस्त केल्यानंतर प्रलंबित रक्कम जमा केली जाईल.
प्राप्त अर्ज मंत्रालयात पाठवण्याची प्रक्रिया
प्रलंबित अनुदानाच्या तक्रारी लक्षात घेता, स्थानिक प्रशासनाने प्राप्त झालेले अर्ज आता मंत्रालयाकडे पाठवण्यास सुरुवात केली आहे. मंत्रालयाकडून या अर्जांची सखोल छाननी केली जाईल आणि तांत्रिक अडथळे दूर केले जातील. एकदा का माहितीची अचूक पडताळणी झाली की, पात्र महिलांच्या खात्यात रखडलेले सर्व हप्ते एकत्रितपणे जमा होण्याची शक्यता आहे.
अनुदान वितरणात विलंब होण्याची इतर कारणे
मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सरकार दोन महिन्यांचे एकत्रित अनुदान देणार होते (Ladki Bahin Yojna 3000 Installment) परंतु काही कायदेशीर बाबींमुळे आणि तांत्रिक पडताळणीमुळे या प्रक्रियेत थोडा विलंब झाला आहे. शासनाचा प्रयत्न आहे की कोणतीही पात्र महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये. त्यामुळे ज्या महिलांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत, त्यांनी आपले बँक खाते ‘डीबीटी’ (DBT) साठी सक्रिय असल्याची खात्री करून घ्यावी.
हे देखील वाचा: रेशन कार्डसंदर्भात सरकारचा कठोर निर्णय: आता या 10 निकषांवर मिळणार धान्याचा लाभ
