ladki bahin yojana kyc last date: लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीला मुदतवाढ मिळणार का? पहा आदिती तटकरे काय म्हणतात

ladki bahin yojana kyc last date: महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर निश्चित केली आहे. मात्र, अद्याप सर्व लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. आतापर्यंत सुमारे 80 लाख महिलांनीच केवायसी पूर्ण केली असून अजूनही लाखो महिला या प्रक्रियेत सहभागी झालेल्या नाहीत. त्यामुळे केवायसीच्या मुदतवाढीची मागणी सातत्याने होत आहे.

आदिती तटकरे यांचे विधान

महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. त्यांनी सांगितले की, “आतापर्यंत सुमारे 80 लाख महिलांचे ई-केवायसी पूर्ण झाले आहे. उर्वरित लाभार्थ्यांचे केवायसी 18 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र, जर सर्वांनी प्रक्रियेत भाग घेतला नाही, तर परिस्थिती पाहून सरकार योग्य निर्णय घेईल.” त्यांच्या या वक्तव्यानंतर मुदतवाढीची शक्यता अधिक बळावली आहे.

ई-केवायसी प्रक्रिया आणि अडचणी

लाडकी बहीण योजनेची केवायसी प्रक्रिया सरकारने https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन स्वरूपात सुरू केली आहे. लाभार्थ्यांना या वेबसाइटवर जाऊन आवश्यक माहिती भरून केवायसी करावी लागते. मात्र, वेबसाइट लोड होण्यात विलंब, ओटीपी न मिळणे अशा तांत्रिक अडचणींमुळे महिलांना त्रास होत आहे. त्यामुळे अनेक तक्रारी सरकारकडे पोहोचल्या. या समस्या लक्षात घेऊन सरकारने प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे.

10th Result Date 2026 Maharashtra Board
यावर्षी दहावीचा निकाल कधी लागणार? 10th Result Date 2026 Maharashtra Board

पूर्वी दररोज केवळ 5 लाख महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण होत होती, पण आता ती क्षमता वाढवून 10 लाख महिलांपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत केवायसीचा वेग वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार?

दरम्यान, महिलांमध्ये आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याबाबत उत्सुकता आहे. ऑक्टोबर महिन्याचा हप्ता काही तांत्रिक कारणांमुळे उशिरा मिळाला होता. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांना नोव्हेंबरचा हप्ता वेळेवर मिळेल का, याबाबत शंका व्यक्त होत आहे. शासनाच्या माहितीनुसार, केवायसी पूर्ण झालेल्या महिलांनाच पुढचा हप्ता मिळणार आहे. त्यामुळे महिलांना शक्य तितक्या लवकर केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

परिस्थितीनुसार निर्णय घेणार सरकार

एकूणच, लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी दिलासा देणारी योजना ठरत असली तरी, केवायसी प्रक्रिया अपूर्ण राहिल्याने काही महिलांना अजूनही अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तथापि, आदिती तटकरे यांच्या विधानानुसार, परिस्थिती पाहून सरकार मुदतवाढ देण्याचा निर्णय घेऊ शकते. त्यामुळे येत्या काही दिवसांत या संदर्भात सरकारकडून महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Measure Land Online
मोबाईलवरून जमीन मोजणी 2026: आता तुमच्या खिशात असेल ‘डिजिटल मोजणीदार’! Measure Land Online

➡️ आधार नंबर टाकून चेक करा EKYC झाली का, फक्त दोनच मिनिटात

Leave a Comment