Maharashtra Rain Update: महाराष्ट्रात मान्सूनचे उशिराने का होईना पण जोरदार आगमन झाले आहे. मुंबई आणि कोकण किनारपट्टीसह राज्याच्या विविध भागांत पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. दरम्यान, हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी राज्यासाठी पावसाचा एक मोठा आणि नवा अंदाज वर्तवला आहे. येत्या २४ जून ते २८ जून दरम्यान राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्यांना वेग येणार असून धरणांच्या पाणीपातळीतही मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
२४ ते ३० जून दरम्यान पावसाचा जोर वाढणार
पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ जूनपासूनच राज्यातील अनेक भागांत पावसाने गती घेतली आहे. आता पुढील काळात म्हणजेच २४, २५, २६ आणि २७ ते ३० जून दरम्यान मान्सून राज्याच्या बहुतांश भागात सक्रिय होईल. या काळात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला:
पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, जमिनीत पुरेसी ओल (किमान ४ इंच) गेल्यानंतरच पेरणीचा निर्णय घ्यावा. घाईघाईत पेरणी करणे टाळावे.
विदर्भ आणि मराठवाड्यात पेरणीयोग्य पाऊस
पुढील ५ ते ७ दिवसांत संपूर्ण महाराष्ट्र पावसामुळे चिंब होणार आहे. विभागवार हवामान अंदाज खालीलप्रमाणे आहे:
१. विदर्भ
- प्रमुख जिल्हे: भंडारा, नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, वाशीम, अकोला, बुलढाणा आणि अमरावती.
- अंदाज: विदर्भात २७ जूनपर्यंत पावसाचा जोर खूप चांगला राहील. यामुळे रखडलेल्या पेरण्यांना वेग येईल.
२. मराठवाडा
- प्रमुख जिल्हे: छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, लातूर, बीड आणि धाराशीव.
- अंदाज: मराठवाड्यातही मान्सून जोरदार एन्ट्री घेणार असून अनेक भागात पेरणीयोग्य पाऊस होईल.
३. पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्र
- पश्चिम महाराष्ट्र: सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर भागात येत्या १० दिवसांत चांगल्या पावसाची शक्यता आहे.
- उत्तर महाराष्ट्र: नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर (अहमदनगर) परिसरात ५ जुलैपर्यंत सर्वदूर पाऊस पडेल.
२ ते २० जुलै दरम्यान ‘अतिवृष्टी’चा इशारा; धरणे भरणार!
पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार, जून महिन्यापेक्षा जुलै महिन्यात पावसाचा जोर अधिक असणार आहे. ५ जुलैपर्यंत संपूर्ण राज्यभरात पाऊस स्थिरावेल.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे २ जुलै ते २० जुलै दरम्यान राज्यात अतिवृष्टी (Heavy Rainfall) होण्याचा अंदाज आहे. (Maharashtra Monsoon Alert)
- अतिवृष्टीचे भाग: मुंबई, कोकण, पुणे जिल्हा आणि उत्तर महाराष्ट्र.
- धरण साठा: या मुसळधार पावसामुळे राज्यातील प्रमुख धरणे जसे की, मराठवाड्यातील जायकवाडी आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोयना धरणाच्या पाणीपातळीत मोठी वाढ होऊन धरणे भरायला सुरुवात होईल.
त्यामुळे यंदा राज्यात दुष्काळाची कोणतीही शक्यता नसून, जुलै महिना जलमय असणार आहे, असा दिलासादायक अंदाज डख यांनी वर्तवला आहे.
हे देखील वाचा: सरकारच्या 5 सर्वोत्तम कर्ज योजना: बिनव्याजी आणि मोठ्या सबसिडीवर मिळवा कर्ज!