PM Viksit Bharat Rozgar Yojana: पहिली नोकरी मिळवणाऱ्यांसाठी 15,000 रुपयांची भेट! ‘विकसित भारत रोजगार योजना’ (PM-VBRY) – अर्ज प्रक्रिया सुरु

PM Viksit Bharat Rozgar Yojana: देशाचा 79 वा स्वातंत्र्यदिन लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक खास भेट जाहीर करून संस्मरणीय केला आहे. तरुणांना पहिल्या नोकरीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी ‘विकसित भारत रोजगार योजना’ (PM Viksit Bharat Rozgar Yojana – PM-VBRY) सुरू करण्यात आली आहे

ही योजना 15 ऑगस्ट 2025 पासून देशभर लागू झाली असून, पहिल्यांदा नोकरी मिळवणाऱ्या तरुणांना 15,000 रुपयांची आर्थिक मदत आणि नियोक्त्यांना (employers) नव्या भरतीसाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. पूर्वी या योजनेचे नाव Employment Linked Incentive (ELI) ठेवण्याचा विचार होता, पण नंतर नाव बदलून ‘विकसित भारत रोजगार योजना’ असे करण्यात आले

योजनेचा उद्देश (PM Viksit Bharat Rozgar Yojana)

• तरुणांना पहिल्या नोकरीसाठी आर्थिक आधार देणे
• उद्योग व कंपन्यांना नवीन रोजगार निर्माण करण्यास प्रोत्साहन
• उत्पादन, सेवा आणि तंत्रज्ञान क्षेत्रात रोजगार निर्मितीला चालना
• 18-35 वयोगटातील तरुणांना कौशल्य विकास + नोकरी या दोन्ही संधी उपलब्ध करून देणे
• एमएसएमई (सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग) क्षेत्राला पाठिंबा
• ‘मेक इन इंडिया’ ला बळकटी देणे आणि नवीन तंत्रज्ञान उद्योगात आणणे
• सामाजिक सुरक्षा सेवा (पेन्शन, विमा) अधिक लोकांपर्यंत पोहोचवणे

मुख्य फायदे (Benefits of PM Viksit Bharat Rozgar Yojana)

कर्मचाऱ्यांसाठी (Employees)

➤ पहिल्यांदा नोकरी मिळाल्यानंतर 15,000 पर्यंत प्रोत्साहन, दोन हप्त्यांत:

• पहिला हप्ता: 6 महिने नोकरी टिकवल्यावर
• दुसरा हप्ता: 12 महिने पूर्ण करून वित्तीय साक्षरतेचे प्रशिक्षण घेतल्यानंतर

➤ पात्रता

• 15 ऑगस्ट 2025 नंतर EPFO नोंदणीकृत संस्थेत जॉइन केलेले
• मासिक वेतन 1 लाख किंवा त्यापेक्षा कमी
• पहिल्यांदा EPF खाते उघडणे आणि आधार – आधारित Face Authentication करून UAN तयार करणे

7/12 Utara Discontinued Maharashtra
सातबारा उतारा बंद होणार, पहा सरकारचा निर्णय 7/12 Utara Discontinued Maharashtra

नियोक्त्यांसाठी (Employers)

➤ प्रति पात्र नवीन कर्मचारी 3,000 प्रतिमाह प्रोत्साहन (DBT द्वारे)

➤ लाभ कालावधी

• सर्वसाधारण क्षेत्रांसाठी – 2 वर्षे.
• उत्पादन क्षेत्रासाठी – 4 वर्षांपर्यंत.

➤ पात्रता

• EPFO-नोंदणीकृत कंपनी असणे

➤ नवीन भरती निकष

• 50 पेक्षा कमी कर्मचाऱ्यांच्या कंपन्या – किमान 2 नवीन भरती
• 50 किंवा अधिक कर्मचाऱ्यांच्या कंपन्या – किमान 5 नवीन भरती
• मासिक ECR वेळेवर सादर करणे
• नवीन भरती किमान 6 महिने टिकवणे आवश्यक

अर्ज प्रक्रिया (PM Viksit Bharat Rozgar Yojana Application Process)

कर्मचाऱ्यांसाठी (Employees)

• स्वतंत्र अर्ज करण्याची गरज नाही
• पहिल्यांदा PF खाते उघडल्यावर आणि ते आधाराशी लिंक केल्यावर योजना लागू होईल
• DBT द्वारे रक्कम थेट आधार-लिंक बँक खात्यात जमा होईल

नियोक्त्यांसाठी (Employers)

• श्रम सुविधा पोर्टल (Shram Suvidha Portal) वर EPFO कोड मिळवणे
• EPFO Employer Login मधून PM-VBRY इंटरफेस वापरणे
• पात्र कर्मचाऱ्यांची भरती करून निकष पूर्ण करणे
• मासिक ECR फाईल सादर करणे
• DBT द्वारे थेट कंपनीच्या PAN-लिंक बँक खात्यात रक्कम जमा होईल (दर 6 महिन्यांनी)

Maharashtra SSC Result 2026
Maharashtra SSC Result 2026: आज दहावीचा निकाल – येथे पहा Live Result

योजना का खास आहे?

• मोठे बजेट: 99,446 कोटी रुपये
• मोठे उद्दिष्ट: 2 वर्षांत 3.5 कोटी नवीन नोकऱ्या
• दुहेरी फायदा: तरुणांना आर्थिक मदत + नियोक्त्यांना प्रोत्साहन
• सोपी प्रक्रिया: कर्मचारी व नियोक्ता, दोघांसाठीही अर्ज व लाभ मिळवण्याची पद्धत सरळ

PM Viksit Bharat Rozgar Yojana

ही योजना रोजगार निर्मिती, कौशल्य विकास आणि आर्थिक स्थैर्य यांचा संगम आहे. पहिल्या नोकरीचा उत्साह आणि त्यासोबत मिळणारे आर्थिक प्रोत्साहन, तरुणांच्या करिअरला नवी उभारी देईल

➡️ Farmers: शेतकऱ्यांसाठी 5 सर्वात फायदेशीर सरकारी योजना – जाणून घ्या संपूर्ण माहिती

Leave a Comment